तुला काय माहीत …
जेंव्हा आपल्यात सर्व निरर्थक आहे
असं घडत होतं … तेंव्हाच
नेमकं तुझ्या अस्तित्वाचा
अर्थ माझ्यात भिनत होता …!
सर्व कागद कित्येकदा फाडलेत मी
ज्यावर तुझे नावं लिहीले होते .
पण मनावर कोरलेले कसे खणून काढावं …?
तुला काय माहीत …
तू परत यावंस असं
वाटत होतं पण .... तेंव्हाच
नेमकं माझ्या अस्तित्वाचा
अर्थ बदलत होता …!!!
" समिधा "