तुला काय माहीत …
जेंव्हा आपल्यात सर्व निरर्थक आहे
असं घडत होतं … तेंव्हाच
नेमकं तुझ्या अस्तित्वाचा
अर्थ माझ्यात भिनत होता …!
सर्व कागद कित्येकदा फाडलेत मी
ज्यावर तुझे नावं लिहीले होते .
पण मनावर कोरलेले कसे खणून काढावं …?
तुला काय माहीत …
तू परत यावंस असं
वाटत होतं पण .... तेंव्हाच
नेमकं माझ्या अस्तित्वाचा
अर्थ बदलत होता …!!!
" समिधा "
Chhan.
उत्तर द्याहटवाThanks a lot Vijay Sir...!
हटवातुम्ही अगदी वर्मावर बोट ठेवलंत...
उत्तर द्याहटवा" मनावर कोरलेले कसे खणून काढावं..…? "
हा प्रश्न सोडवण्यामागे माझे कितीतरी दिवस गेलेत पण उत्तर मिळालं नाही...
आणि त्यावरून हे जाणवलं कि काही प्रश्नांची उत्तरे न शोधलेलीच बरी....
अगदी माझ्या मनातलं लिहिलंत आपण...
एकदम छान....
Thanks Shripad...!!! tu mhantos te khara aahe kkahi prashnana uttare nasataat..! ashich anu uttarit rahun jiv jalat rahatat...!!!
हटवा